प्राचार्या - डॉ. सुचित्रा नाईक
ठाणे –
” गेल्या अनेक वर्षांपासून जोशी – बेडेकर महाविद्यालयात साजरा होणारा ‘नवरंग’ महोत्सव म्हणजे आदर्शाचा मापदंड आहे. नवरंग महोत्सवाने अनेक परिवर्तने पाहिली. विद्यार्थ्यामधील कलागुणांना अधिक सशक्त करण्यासाठी नवरंग महोत्सवाची भूमिका महत्वाची ठरली आहे.” असे गौरवोद्गार जोशी – बेडेकर कला – वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी काढले.
ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये नवरंग चे आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाचा उद्घाटन सोहळा प्राचार्य सुचित्रा नाईक नवरंग महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. यावेळी नवरंग प्रमुख डॉ.मुग्धा केसकर, उपप्राचार्या डॉ. प्रियंवदा टोकेकर, उपप्राचार्य डॉ.महेश पाटील, प्रा.नारायण बारसे, प्रा. अंजली पुरंदरे,प्रा. माधवी जोशी, डॉ.नितीन वाडविंदे उपस्थित होते.यावेळी बोलताना प्राचार्या नाईक पुढे म्हणाल्या,” नऊ अंक हा महत्वाचा असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात नऊ रसांचे महात्म्य सांगितलेले आहे.मानवी जीवन सौन्दर्यांनी भरलेले आहे.त्यांचा अनुभव शिस्तीने व शांततेने घेता येतो. महाविद्यालयातील विद्यार्थी यशस्वीपणे शिक्षण घेऊन बाहेर पडतात तेव्हा महाविद्यालयातील आनंदाच्या, यशाच्या, महोत्सवाच्या आठवणी सोबत
घेऊन जातात. कॉलेजची संस्कृती ही एक शिक्षण गंगोत्री आहे. हे विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा नवरंगच्या विविध आठवणी सांगतात. तेव्हा कुसुमाग्रजांच्या ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारकादळे जणू नगरात’, या कवितेची आठवण होते. यावेळी नवरंग प्रमुख मुग्धा केसकर यांनीही विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उस्फुर्त सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले. सुरुवातीला डॉ. वा.ना. बेडेकर यांच्याप्रतिमाशिल्पाला पुष्पहार
अर्पण करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. गणपती बाप्पाच्या गीताने सारे वातावरण भक्तिमय झाले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, भरनाट्यम्, ऑर्केस्ट्राचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली
यंदाच्या नवरंगची थीम परिवर्तन – अ जर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आहे. या थीम मधून अनेक कला, कौशल्य नेतृत्वाचे नवरंग या महोत्सवात दिसत आहेत. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निशांक दुबे, प्रिया पाटील यांनी केले. कलेचा हा आविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. नवरंग आदर्श
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून साई संदीप नाईक आणि अथर्वा तुपे यांना प्राचार्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यामधील स्किल डेव्हलपमेंट आणि उद्योजक्तेला वाव मिळावा यासाठी महाविद्यालयाच्या आवारात विविध वस्तूंचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते.
